सरकारची शेतकऱ्यांसाठी नवी योजना; या शेतकऱ्यांना होणार फायदा! Drought Mitigation Project

Drought Mitigation Project महाराष्ट्र राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF) अंतर्गत ‘दुष्काळ निवारण प्रकल्प’ (Drought Mitigation Project) राबवण्यासाठी अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे.

योजनेची व्याप्ती आणि निधी

हा प्रकल्प राज्यातील ५ जिल्ह्यांमधील १० तालुक्यांतील एकूण ९० गावांमध्ये राबवला जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी, नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी आणि शेतीला आधार देण्यासाठी या योजनेत ₹१७४.१० कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमध्ये केंद्र शासनाचा NDRF निधी, राज्य शासनाचा SDRF (State Disaster Response Fund) निधी, आणि राज्य व केंद्र सरकारच्या इतर योजनांच्या अभिसरणाचा (Convergence) समावेश आहे.

Leave a Comment