शेतकरी कर्जमाफी; सरकारचे नवीन धोरण! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ! farmer loan waiver rule

farmer loan waiver rule राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जाचा डोंगर आजही एक मोठे संकट आहे. अशा परिस्थितीत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ डिसेंबर रोजी ‘सकाळ संवाद’ कार्यक्रमात पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊन आशा पल्लवित केल्या आहेत. मात्र, या आश्वासनासोबतच त्यांनी कर्जमाफीच्या धोरणात मोठा बदल करण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

कर्जमाफीची नवी दिशा: ‘संपूर्ण’ नाही, तर ‘गरजेनुसार’! farmer loan waiver rule

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘संपूर्ण कर्जमाफी’ आणि ‘सातबारा कोरा’ करण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री आता आपल्या भूमिकेपासून दूर गेल्याचे दिसत आहेत. आता ते स्पष्टपणे सांगत आहेत की, ही मदत केवळ ‘ज्यांना खरोखर आवश्यकता आहे’ त्याच शेतकऱ्यांना दिली जाईल.

Leave a Comment